Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ A major update for ration card holders ] : शिधापत्रिका धारकांसाठी आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे , यांमध्ये ई-केवायसी करण्याचे कारण , ई-केवायसी न केल्यास होणारे परिणाम , तसेच अंतिम मुदत या या बाब यामध्ये नमुद करण्यात आलेली आहेत .
ई-केवायसी का करावी ? : रेशनकार्ड धारकांना लाभ निरंतर चालु ठेवण्यासाठी सदर ई- केवासयी करणे अनिवार्य असणार आहे . सदर अन्नधान्य फक्त पात्र असणाऱ्या कुटुंबानाच मिळणार असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी ई – केवायसी करावी लागेल .
ई – केवायसी न केल्यास होणारे परिणाम : ई – केवायसी न केल्यास लाभार्थी धारकांना रेशन मिळणार नाही , तसेच त्यांचे रेशनकार्ड हे निष्क्रिय होईल .
ई – केवायसी कशी करता येईल ? : ई – केवायसी लाभार्थ्यांसाठी आधार कार्ड सादर करणे आवश्यक असणार आहे , यांमध्ये बायोमेट्रिक करणे आवश्यक असणार आहे . तसेच आधारकार्ड रेशनकार्डशी लिंक असेल अशाच प्रकरणी ई- केवायसी पुर्ण करता येणार आहे .
हे पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांवर सध्याचे प्रत्यारोप व दुसरी बाजू ; जाणून घ्या महत्वपूर्ण लेख !
ई – केवायसी करण्याची अंतिम मुदत ही 31.07.2025 ही अंतिम मुदत असणार असल्याची माहिती राज्याचे मा.अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे .
सदर ई- केवायसी कशी कराल ? : ई-केवायसी करण्यासाठी rcms.mahafood.gov.in या संकेतस्थळावर अथवा आपल्या जवळच्या शिधावाटप कार्यालयाशी भेट देवून आधारकार्ड लिंक करु शकता .
- अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या बाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.04.03.2026
- दि.11 मार्च रोजी फक्त महिला कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करणेबाबत शासन निर्णय (GR) निर्गमित दि.04.03.2026
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.04.02.2026 रोजी निर्गमित झाले 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- राज्य कर्मचारी संदर्भात इतर 03 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.26.02.2026
- राज्यातील पेन्शन धारकांना डी.ए वाढ बाबत वित्त विभाग मार्फत 3 शासन निर्णय GR निर्गमित दि.26.02.2026