मुंबई प्रतिनिधी , राहुल पवार : राज्य शासन सेवेतील अकार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आता राज्य शासनांकडून कडक कायदेशिर कार्यवाही करण्यात येणार आहेत . अकार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनांच्या सेवानिवयमांनुसार जनतेच्या हिताचा विचार करता मुदतपुर्व सेवानिवृत्तीची तरतुद करण्यात आलेली आहे .
परंतु या नियमांचे काठेकोरपणे पालन करण्यात येत नव्हते , परंतु आता राज्य शासनांकडून कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याची राज्य शासनांकडून देण्यात आलेली आहे , यामुळे आता अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना घरचा आहेर मिळणार आहे .
मुदतवपुर्व सेवानिवृत्तीचा नियम नेमका काय आहे ? ; महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 नियम 10 ( 4 ) आणि नियम 65 नुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वयाच्या 50 /55 वर्षांनंतर अथवा सेवेच्या 30 वर्षानंतर कर्मचाऱ्यांची सेवेत राहण्याची पात्रपात्रता आजमविण्याची तरतुद करण्यात आलेली आहे .यानुसार जे कर्मचारी कार्यक्षम असतील अशाच कर्मचाऱ्यांच्या सेवा पुढे चालु ठेवण्यात येतात , तर अकार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडीत करण्यात येतात म्हणजेच मुदतपुर्व सेवानिवृत्ती देण्यात येतात .
हे पण वाचा : शासकीय आश्रमशाळा मध्ये शिक्षक पदांसाठी महाभरती…
शासन सेवेत अकार्यक्षम असतील अशा कर्मचाऱ्यांमुळे सेवा बजावत असताना कामामध्ये व्यत्यय / कमीपणा येवू नये याकरीता राज्य शासनांच्या नियमांनुसार कठोररित्या पालन करणे आवश्यक असल्याचे माजी प्रशासकीय अधिकारी श्री.एन पी.मित्रयोत्री यांनी सांगितले आहे .

- आठवा वेतन आयोग बाबत महत्वपुर्ण पत्र निर्गमित दि.03.02.2026
- माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी 2026 वेतन ( Payment ) करीता अनुदान निधी वितरण GR निर्गमित दि.04.02.2026
- प्रशासकीय नाविन्यता , उत्कृष्टता व सुशासन या संकल्पना करीता सर्व कार्यालयांमध्ये करावे लागेल हे काम ; GR निर्गमित दि.04.02.2026
- अर्थसंकल्प 2026 मध्ये काय स्वस्त व काय महाग झाले ? जाणून घ्या सविस्तर .
- राज्यात दि.07 व 08 फेब्रुवारीला सलग 02 दिवस सुट्टी ; जाणून घ्या सविस्तर शासन निर्णय ( GR )