Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ 553 post Seva Pravesh rule change shasan nirnay ] : राज्यातील तब्बल 553 संवर्गाचे सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करणे संदर्भात सामान्य प्रशासन विभाग कडून दिनांक 05 मे 2026 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या शासन निर्णयानुसार सुयोग्य उमेदवारांची निवड करणे शक्य व्हावे , याकरिता पदभरती प्रक्रिया अधिक एकसंघ, सुलभ, परिणामकारक व कालबद्ध करण्याकरिता सुधारित परीक्षा पद्धती संवर्गाचे तर्कसंगत व वर्गीकरण सेवाप्रवेश नियमाचे सुसूत्रीकरण आणि निवड प्रक्रियेचे प्रमाणिकरण करण्याकरिता सेवा प्रवेश नियमांमधील शैक्षणिक पात्रता अनुभव प्राध्यान्य तसेच कौशल्य व इतर अनुषंगिक बाबींमध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
महाराष्ट्र लोकसेवा आयोग व्यतिरिक्त स्वतंत्र शासकीय यंत्रणेद्वारे भरती करण्यात येणाऱ्या संवर्गांना सुधारणा लागू होणार नाहीत असे नमूद करण्यात आले आहेत . या संवर्गाची भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच सुरू असणार आहे ( यामध्ये पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती पोलीस भरती बोर्ड द्वारे पोलीस भरती )
गट ब अराजपत्रित तसेच गट क मधील कोणत्याही पदासाठी उमेदवारांची निवड करताना मौखिक परीक्षा म्हणजेच मुलाखत घेण्यात येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहेत .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय खालील प्रमाणे पाहू शकता ..
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- UPI पेमेंटबाबत नवे नियम; सर्व व्यवहारांवर शुल्क लागणार का?
- पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या घडामोडी; आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष
- दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा