नोकरदार वर्ग संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने‍ दिला महत्वपुर्ण / दिलासादायक निर्णय ; जाणून घ्या सविस्तर निकाल !

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Supreme Court gives important/comforting decision regarding the working class ] : आजकाल अपघातीचे मृत्युचे प्रमाण अधिकच वाढले आहेत . शिवाय नोकरदार वर्गांमध्ये ताण – तणावाचे परिणाम देखिल अपघाती मृत्युचे कारण ठरत आहेत .

यामुळे सर्वोच्च न्यायालयांकडून स्पष्ट केल्यानुसार भरपाई कलम 1923 च्या 03 मधील तरतुदीनुसार कामामुळे निवासस्थान ते कामाचे ठिकाण दरम्यान प्रवास करताना होणारे अपघात हे देखिल ड्युटीचा भाग समजण्यात येईल . ज्यामुळे कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई कायद्या अंतर्गत लाभ दिला जाईल .

याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती मनोज मिश्रा व के.व्ही .विश्वनाथन यांच्या यापुर्वीच्या सदर संदर्भातील गोंघळ व अस्पष्टता दुर करुन निकाल दिला आहे . यामुळे आता यापुढे कर्मचाऱ्यांचा ड्युटीसाठीचा प्रवास हा कर्तव्य काळ समजण्यात येणार आहे .

अपघाताची स्थिती , काळ , व स्थान आणि रोजगार यांच्या मध्ये संबंध प्रस्थापित असल्याने , कर्मचाऱ्यांना ड्युटीकरीता निवासस्थानापासुन ते कामाच्या ठिकाण पर्यंत जाण्यासाठी व परत येताना होणाऱ्या अपघाताचा समावेश हा कर्तव्य काळ / सेवेचा काळ समजण्यात येणार आहे .

हे पण वाचा : राज्य कर्मचारी व निवृत्तीचे वय … ( Retirement Age ) ; संक्षिप्त आढावा !

यांमध्ये एक साखर कारखान्यातील चौकीदार याचा दिनांक 22.04.2003 रोजी अपघाती मृत्यु झाला होता . त्याचे कामाचे तास हे सकाळी 03 ते सकाळी 11 पर्यंत होते . त्याचा ड्युटीवर जात असताना अपघाती मृत्यु झाला .

यामुळे त्याच्या वारसांना मुंबई उच्च न्यायालयाच्या माहे डिसेंबर 2011 च्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सवोच्च न्यायालयांमध्ये दाखल केली व सर्वोच्च न्यायालयांमध्ये अखेर न्याय मिळाला व त्यांच्या वारसांना 3 लाख 26 हजार 140/- भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले .

Leave a Comment