Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Chief Minister’s assurance regarding farmer loan waiver ] : माजी आमदार तथा मंत्री बच्चुभाऊ कडू हे शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी याकरिता उपोषणावर बसले आहेत . याबाबत राज्याचे मा.मुख्यमंत्री यांनी अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफी देवू अशी ग्वाही देण्यात आलेली आहे .
निवडणुकीच्या वेळी महायुती व महाविकास आघाडी दोन्ही पक्षांकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी करु असे आश्वासन देण्यात आलेले होते . आता राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून , शेतकरी कर्जमाफी बाबत विलंब का होत आहे ? असा प्रश्न विरोधक यांच्याकडून वारंवार विचारला जात आहे .
कर्जमाफी बाबत मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले ? : राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलताना सांगितले कि , राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी बाबत दिलेला शब्द मागे घेणार नसुन , कर्जमाफी कधी करायची …
याबाबत नियम / पद्धती करुन योग्य वेळी याबाबत निर्णय घेण्यात येईल , असे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत .
यंदा सोसायटीचे देखिल कर्जमाफी होणार : शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिककर्जाचा भरणा राज्य सरकारकडून केला जातो . पंरतु बऱ्याचदा शेतकऱ्यांनी सोसायटी मार्फत घेतलेले कर्ज माफ होत नाहीत , तर यावेळी शेतकऱ्यांनी सोसायटी मार्फत घेतलेल्या कर्ज माफ करण्याचा विचार सरकारकडून करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे .
कर्जमाफी का हवी ? : शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायलाच हवे , कारण आपल्या देशातील महागाईचा विचार करुन सरकारकडून काही अन्नधान्यांच्या निर्यातीवर बंदी घातली जाते . यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी जागतिक बाजारपेठ खुली होत नाही , परिणामी शेतमालाला योग्य भाव मिळत नाही .यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणे आवश्यक आहे .