@marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ The employees’ protest finally achieved great success ] : दिनांक 13 जून 2025 पासून आदिवासी विकास विभाग अंतर्गत रोजंदारी / तसिका पद्धतीने काम करणाऱ्या शिक्षक / कर्मचाऱ्यांचे नाशिक ते मुंबई असा बिऱ्हाड आंदोलन काढण्यात आले .
सदर आंदोलन थांबवण्यासाठी प्रशासनाकडून विविध मार्ग अवलंबिले , परंतु सदर आंदोलन कर्ते आपल्या मागणीवर तटस्थ राहिल्याने , अखेर प्रशासनाला सदर शिक्षक / कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागल्या .
मागण्या : सदर तासिका / रोजंदारी पद्धतीने कार्यरत शिक्षक / कर्मचाऱ्यांना बाह्यस्त्रोद्वारे नियुक्ती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता . परंतु बाह्यस्त्रोताद्वारे नियुक्ती दिल्याने , सदर शिक्षकांच्या रोजंदारी / तासिका तत्त्वावरील सेवा पुढे ग्राह्य धरल्या जाणार नाहीत . यासाठी सदर शिक्षक / कर्मचाऱ्यांना बाह्यस्त्रोताद्वारे नियुक्ती न देता ..रोजंदारी / तासिका तत्वावर नियुक्ती देण्यात यावी ही प्रमुख मागणी होती .
प्रशासनाचे निर्देश : सदर मागणीवर प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय घेत , ज्या शिक्षक / कर्मचाऱ्यांची सेवा रोजंदारी पद्धतीने तीन वर्ष पूर्ण झाली आहे , अशा शिक्षक / कर्मचाऱ्यांना पुन्हा रोजंदारी / तासिका पद्धतीने नियुक्ती दिली जाणार आहे .
तर ज्यांची सेवा तीन वर्षापेक्षा कमी झाली आहे , अशा शिक्षक / कर्मचाऱ्यांना बाह्य स्त्रोताद्वारे नियुक्ती दिली जाणार आहे . बाह्य स्त्रोताद्वारे नियुक्ती दिल्याने , सदर शिक्षक / कर्मचाऱ्यांची नियुक्ती / नियंत्रण / वेतन बाह्य स्त्रोत कंपनीद्वारे केले जाईल .
आदिवासी विकास विभागामध्ये रोजंदारी / तासिका पद्धतीने दहा वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या शिक्षक / कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित केले जाते . ही परंपरा वर्षानुवर्षे सुरूच आहे , यामुळेच सदर रोजंदारी / तासिका तत्वावरील कार्यरत शिक्षक / कर्मचारी यांच्याकडून बाह्यस्त्रोताद्वारे नियुक्तीस विरोध केला जात आहे .