@marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ The state government is succeeding in curbing corruption in government offices ! ] : सरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार कमी / अधिक प्रमाणात होतच असतो . परंतु मागील 03-04 वर्षांपासुन राज्य शासन सेवेत भ्रष्टाचाराला 50 टक्के आळा घालण्यात राज्य सरकाराला यश मिळाले आहे .
भ्रष्टाचार का होतो ? : भ्रष्टाचार हा सरकारी कर्मचाऱ्यांकडूनच केला जातोय असा नाही , तर नागरिक देखिल आपले काम जलद गतीने करुन घेण्यासाठी स्वत : होवून लाच देतात , त्यामुळे भ्रष्टाचाराला अधिक वाव मिळतो .
भ्रष्टाचार कमी होण्याचे कारणे : माहितीचा अधिकार हा एक मोठा कारण आहे , कारण माहितीच्या अधिकारामध्ये नागरिक राज्यातील सर्व विभागातील कार्यालयाची माहीती घरी बसल्या ऑनलाईन माध्यमातुन अर्ज सादर करुन मागवू शकतात .
ऑनलाईन सुविधा : भ्रष्टाचार कमी होण्याचे दुसरे मोठे कारण ऑनलाईन सुविधा हे देखिल आहे . कारण पुर्वी ऑफलाईन सुविधामुळे अनेक भ्रष्टाचार व्हायचे , आता ऑनलाईन सुविधामुळे कर्मचाऱ्यांचा थेट नागरिकांशी संपर्क कमी झाला आहे . परिणामी भ्रष्टाचाराला आळा बसत आहे .
प्रसार माध्यमे : सध्या सोशल मिडीया भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मोठी भूमिका बजावत आहे . यामुळे सध्या कोणी सरकारी कर्मचारी लाच घेण्यापासुन स्वत : ला सावरत आहे .
साक्षरता मध्ये वाढ : सध्या देशाची साक्षरता वाढली आहे , यांमध्ये कायदे पंडितांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे . यामुळे नागरिकांना आपले हक्क व अधिकार समजत आहेत . यामुळे भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे .